जय श्रीराम!
#श्रीमहाराजांचेज्येष्ठशिष्य
गोंदवले संस्थानाचे पंच!
श्री दत्तात्रय विनायक खाडिलकर
यांचा पंच पदाचा कार्यकाळ ३०/६/१९३७ ते २८/१२/१९५४)
**
*****
काशिनाथ नरहर (सरदार) कुलकर्णी, गिरवीकर
हे सुद्धा गोंदवल्याचे पंच होते. त्यांचा कार्यकाळ २१/१२/१९३९ ते १/४/१९६०
श्री. यशवंत नरहर कुलकर्णी उर्फ येसुकाका यांनी आपल्या बारा वर्षाच्या नातवाला पंढरपूरला शिक्षणासाठी ठेवले होते. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम मुलाच्या मनावर झाला आणि तो परागंदा झाला. येसूकाका श्रीमहाराजांचेकडे गेले व त्यांनी सर्व हकिकत त्यांना सांगितली. श्रीमहाराज म्हणाले, 'काळजी करण्याचे काही कारण नाही, तुमचा नातू लवकरच सापडेल.' नातू माहुली येथे सापडला. येसुकाकांनी नातवाला लगेच श्रीमहाराजांकडे आणले. मुलाला पाहताच श्रीमहाराज म्हणाले, 'माझा नातू आला; पुरण पोळी करा.'
श्रीमहाराजांना नमस्कार करताच त्यांनी त्याला आपल्या जवळ बसवून त्याला उपदेशपर चार गोष्टी सांगितल्या व अनुग्रह दिला, आणि येसुकाकांकडे वळून ते म्हणाले, 'त्याचेकडे तुमचे घरातील कारभाराची किल्ली द्या; आता तो कोठे जाणार नाही.'
हा पळून जाणारा नातू म्हणजे कै. काशीनाथ नरहर कुलकर्णी उर्फ सरदार गिरवीकर. हे पुढे गोंदवले संस्थानचे पंच होते.
🌿 ~ चैतन्य - स्मरण १९८८ मधील पंढरीनाथ काशिनाथ कुलकर्णी यांच्या लेखातून.
**
जय श्रीराम!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा